Sunday 22 January 2017

शब्द - शब्द,  फुल - फुल,

कधी उमगतात
कधी उमलतात
कुठे बहरतात ...
कळत नाही !
शब्द - शब्द,  फुल - फुल,  ।। १ ।।

कधी हिरवे
कधी गुलाबी
फिके पडतात ...
कळत नाही !
शब्द - शब्द,  फुल - फुल, ।। २ ।।

कधी सुगंध
कधी ऋतू
कसे दरवळतात ...
कळत नाही !
शब्द - शब्द,  फुल - फुल,  ।। ३ ।।

कधी मैत्रीण
कधी प्रियसी
आपलेसे होतात ...
कळत नाही !
शब्द - शब्द,  फुल - फुल,  ।। ४ ।।

कधी सुंदर
कधी गचाळ
कसे जन्मतात ... 
कळत नाही !
शब्द - शब्द,  फुल - फुल,  ।। ५ ।।

कधी ऊन
कधी वारा
ओलेचिंब होतात ...
कळत नाही !
शब्द - शब्द,  फुल - फुल,  ।। ६ ।।

कधी गोड
कधी कडू
तिखट बनतात ...
कळत नाही !
शब्द - शब्द,  फुल - फुल, ।। ७ ।।


अक्षय भळगट 
२३.०१.२०१७

Tuesday 18 August 2015

…. लेकीन

जिना सिखा नही इन यादो के बिना …. लेकीन
बह जाती है वो यादे भी ., आंसूओ के सहारे

अधुरी रह जाती ही कश्ती जिंदगी कि …. लेकीन
ख्वाब बोये जाते है ., आंखो के सहारे

कहते ही लोग " अजमाये नसीब अपना - अपना "… लेकीन
हौसले बुलंद होते ही ., तकदीर के सहारे

करता नही रहम भी वो खुदा अपने बंदो पर…. लेकीन
करनी पडती है इबादत भी ., हातो के सहारे

कटती नही जिंदगी बैठकर मेह्खानो मे… लेकीन
काटणी पडती है रह भी ., पेऱो के सहारे

इतना आसान नाही मरणा इस जहान मे … लेकीन
जाणा पडता है शमशान भी ., कंधो के सहारे


अक्षय भळगट
१९.०८.२०१५  



Tuesday 30 June 2015

पाऊसही आपल्या मित्रांसारखाच असतो !

पाऊसही आपल्या मित्रांसारखाच असतो !

नकळत येतो  .,जिवलग होतो ….
नकळत जुळते ., नाते - संबंध …
नकळत होते ., मनही बेधुंद …
असाच … नकळत आपलासा होतो …
म्हणूनच …
पाऊसही आपल्या मित्रांसारखाच असतो !

कधी हसवतो ., कधी रडवतो .,
कधी रुसतो ., कधी उमगतो .,
कधी खूप शांत ., कधी खूप बोलतो .,
कधी भिजवतो ., कधी सामावून घेतो .,
मीही असाच त्यात भरकटत जातो …
म्हणूनच ….
पाऊसही आपल्या मित्रांसारखाच असतो !

कधी गर्जतो … धडाम-धडा …।
कधी हळुवार स्पर्शती धारा ….
जेव्हा हवा-हवासा वाटतो …
तेव्हाच दूर निघून जातो ….
कधी खूपच तुटल्यासारखा भासतो …
अन मलाच प्रश्नात पडतो … !
असा का अचानक " हा " सोडून जातो … ????
त्यावर एकाच उत्तर मिळत …
पाऊसही आपल्या मित्रांसारखाच असतो !

अक्षय भळ्गट
३०.०६.२०१५  

Monday 15 June 2015

स्वप्नांची घरे, त्यांना डोळ्यांचे दार

स्वप्नांची घरे, त्यांना डोळ्यांचे दार
तुझ्याच आठवणींनी , त्यांना सजवलय फार

मिटता डोळे  दिसते …, तूच सगळी कडे .,
उघडता क्षणी होतो ., सर्वत्र अंधार …
स्वप्नांची घरे, त्यांना डोळ्यांचे दार

निजता अंथरुणी … ऊब तुझीच भासते …,
घट्ट कवटाळता उशी ., झोप लागते गाढ ….
स्वप्नांची घरे, त्यांना डोळ्यांचे दार

पाऊला - पाऊला वर होतो., भास तुझा चोहीकडे
स्पर्श करता तुज ., मन हि होते बेजार ….!
स्वप्नांची घरे, त्यांना डोळ्यांचे दार

हलक्या - हलक्या बोलांची ,
आखीव सुंदर चारोळ्या .,
सांगड तुझ्या आठवणींशी ,
घाले कवितेच्या ओल्या .,
तुझ्या मोजक्या क्षणांशी .,
हितगुज होते फार …।
स्वप्नांची घरे, त्यांना डोळ्यांचे दार

अक्षय भळगट
१५.०६.२०१५


Friday 12 June 2015

विचार कर माझा …!

तु म्हणत असतेस " मी " मित्र आहे तुझा ….!
पण एकदातरी … विचार करून बघ माझा … !

सगळ माहितीये तुला , तरी लय नाटक करते …!
का कोणास ठाऊक ., पण इतका भाव खाते …!
कळलाय तुझा ATTITUDE … बास झाली ना सजा …।
आता एकदा तरी स्वताहून ., विचार कर माझा …!

एकदा मनापासून -  " हो " म्हणून तर बघ ,
गवसेल तुलाही ., तुझ्या स्वप्नातलं जग …!
" हो " म्हणण्यातच बघ, किती असते मज्जा ….
फक्त एकदा मनापासून ., विचार कर माझा …!

नको करू काळजी ., असेन ना मी " सोबती " …!
दुःख हि नाही दरवळणार ., तुझ्या अवती-भवति …!
सुखाचेच क्षण असतील तुला मोजण्या …!
त्यासाठी एकदा तरी ., विचार कर माझा …!

माझ काय " हो " आहे , पण तुझाच निर्णय अंतिम असेल …
खरच सांगायचं तर …, आपलीच जोडी सुंदर दिसेल …!
काहीही ठरवलस तरीही , शेवटी मित्र असेनच तुझा …।
पण जर personally सांगतो ….,
एकदा तरी … विचार करून बघ माझा … !
एकदा तरी … विचार करून बघ माझा … !

अक्षय भळगट
१२.०६.२०१५

Wednesday 29 April 2015

त्यांचा पश्चाताप …

खरंच कुठेतरी चुकतो आपण …
जिवनात …, आपल्याच माणसांना मुकतो आपण …
नडतो आपलाच अहंकार आपल्याशीच …,
म्हणूनच तर ,
आपल्याच चुका भोगतो आपण !     (१)

समोरच्या शब्दाला शब्द वाढवतो आपण …
आपल्याच शब्दांवर पश्चाताप करतो आपण …
ठरत शहाणपण आपल …, माती खाल्याजोग …
म्हणूनच तर ,
आपल्याच हातांनी " शेण " खातो आपण !    (२)

पुढ नीट वागायचं …, हे हि ठरवतो आपण ….
नवीन रूढी , नवीन परंपरा अवलंबतो आपण …।
पण काही केल्या ., अंगातला " किडा " जात नाही ….
म्हणूनच तर ,
सरळ चालण्यासाठी जगाला वळण लावतो आपण … !

अक्षय भळगट
२९.०४.२०१५




Wednesday 15 April 2015

" मी-पण … !"

" मी-पण … !"

अवघड असत ., कुणाच्या इतक्या जवळ जाऊन ., परत तीच ताटा-तूट भोगन ….
मित्र - मैत्रिणी - त्यांचा सहवास - बोलण - हसण - रुसण - आपलेपणा .,
कुठेतरी मनाला ठेस लावून घेण्यापेक्षा ….
आधीपासूनच ठरवलं कि ., बास आता " नाही बोलायचं " ।
त्यामुळे एक वेळ अशी येईल कि …. तुम्हालाच एकटेपणाची सवय होऊन जाईल .

कोणी दूर जाताना होणाऱ्या यातना या आधीही भोगल्या आहेत .,
अजुनही मनाला लागलेल्या / पोळलेल्या जखमा, माझ्या "आठवणीं " सारख्याच
ताज्या आहेत .,

त्याला अजून त्रास नको म्हणून … संपर्क , सहवास कमी करावा लागतो .,
कारण प्रत्येक जण इतका मनाशी सलग्न आहे की
माझ्यातला " मी " कोण ??? हा प्रश्न नेहमी पडतो … !

या मित्रांमध्येच " मी " दडलेलो आहे , हे त्यांच्या सहवासातून कळाल मला !
पण तेच दुरावले तर माझ " मी पण .. !" हरवून बसेन कि काय ., याचीच भीती वाटते !
बस इतकच …. !