Wednesday 29 April 2015

त्यांचा पश्चाताप …

खरंच कुठेतरी चुकतो आपण …
जिवनात …, आपल्याच माणसांना मुकतो आपण …
नडतो आपलाच अहंकार आपल्याशीच …,
म्हणूनच तर ,
आपल्याच चुका भोगतो आपण !     (१)

समोरच्या शब्दाला शब्द वाढवतो आपण …
आपल्याच शब्दांवर पश्चाताप करतो आपण …
ठरत शहाणपण आपल …, माती खाल्याजोग …
म्हणूनच तर ,
आपल्याच हातांनी " शेण " खातो आपण !    (२)

पुढ नीट वागायचं …, हे हि ठरवतो आपण ….
नवीन रूढी , नवीन परंपरा अवलंबतो आपण …।
पण काही केल्या ., अंगातला " किडा " जात नाही ….
म्हणूनच तर ,
सरळ चालण्यासाठी जगाला वळण लावतो आपण … !

अक्षय भळगट
२९.०४.२०१५




Wednesday 15 April 2015

" मी-पण … !"

" मी-पण … !"

अवघड असत ., कुणाच्या इतक्या जवळ जाऊन ., परत तीच ताटा-तूट भोगन ….
मित्र - मैत्रिणी - त्यांचा सहवास - बोलण - हसण - रुसण - आपलेपणा .,
कुठेतरी मनाला ठेस लावून घेण्यापेक्षा ….
आधीपासूनच ठरवलं कि ., बास आता " नाही बोलायचं " ।
त्यामुळे एक वेळ अशी येईल कि …. तुम्हालाच एकटेपणाची सवय होऊन जाईल .

कोणी दूर जाताना होणाऱ्या यातना या आधीही भोगल्या आहेत .,
अजुनही मनाला लागलेल्या / पोळलेल्या जखमा, माझ्या "आठवणीं " सारख्याच
ताज्या आहेत .,

त्याला अजून त्रास नको म्हणून … संपर्क , सहवास कमी करावा लागतो .,
कारण प्रत्येक जण इतका मनाशी सलग्न आहे की
माझ्यातला " मी " कोण ??? हा प्रश्न नेहमी पडतो … !

या मित्रांमध्येच " मी " दडलेलो आहे , हे त्यांच्या सहवासातून कळाल मला !
पण तेच दुरावले तर माझ " मी पण .. !" हरवून बसेन कि काय ., याचीच भीती वाटते !
बस इतकच …. !